जैन मुनींचा उद्धव आणि राज ठाकरे यांच्यावर हल्लाबोल; ठाकरे गटाच्या नेत्याकडून जैन मुनींना प्रत्युत्तर
जैन मुनींची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर विखारी टीका; ठाकरे गटाच्या अखिल चित्र यांनी व्हिडिओ जारी करत दिले प्रत्युत्तर.
Jain sages attack Uddhav and Raj Thackeray : मुंबईतल्या संपूर्ण लालबाग (Lalbaug) परिसरात उद्धव ठाकरे (Udhhav Thackrey) यांचंच राज्य आहे. माझ्या बिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम झाला आहे म्हणून तुम्ही कोणत्याही नेत्याला फोन करा. ते येणार नाहीत. आमदार त्यांचेच, खासदार त्यांचे आणि नगरसेवक देखील त्यांचेच, आणि हे चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील हे लक्षात ठेवा. असं म्हणत जैन मुनी निलेशचंद्र विजय (Jain sages nileshchandra vijay) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर जस चिकनच्या नादाला लागून शिवसेना गेली, त्याचप्रमाणे तुम्ही देखील झिरो व्हाल. अशी विखारी टीका त्यांनी मनसे (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) यांच्यावर केली आहे. त्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे(Akhil Chitre) यांनी जैन मुनींवर जोरदार हल्लाबोल केलाय.
ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी जैन मुनींचा एक व्हिडिओ शेअर करत म्हटले आहे की, पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात कोणी काय खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाला ते ठरवण्याचा अधिकार आहे. त्यावर बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही. शिवसेनेनं देरासरसमोर चिकन शिजवलं नव्हतं. मुनी असाल तर खोटं बोलणं पाप आहे, हे लक्षात ठेवा. दुसरं म्हणजे शिवसैनिक जैन मतदारांना मारहाण करतात, हा तुमचा आरोप देखील सरासार खोटा आहे. आमचे खासदार, आमदार आणि नगरसेवक हे प्रत्येक नगरसेवकाची सेवा करतात. तेही कोणताही धर्म किंवा जात न पाहता. आणि हो विलेपार्ल्यात जैनालाय नेमकं कोणामुळे वाचलं? ते तोडलं जात होतं तेव्हा कोणाचं सरकार होतं?. याचाही जरा मागोवा घ्या, असा सल्ला त्यांनी जैन मुनींना दिला आहे.
पहिलं,महाराष्ट्रात प्रत्येकाला काय खायचं ते ठरवण्याचा अधिकार आहे. त्यावर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. आणि शिवसेनेने देरासरसमोर चिकन शिजवलं नव्हतं.मुनी असाल तर खोटं बोलणं पाप आहे, हे लक्षात ठेवा.दुसरं,
“शिवसैनिक जैन मतदारांना मारहाण करतात” हा आरोप सरळसरळ खोटा आहे.आमचे… pic.twitter.com/pWFjuSL7sP— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) December 6, 2025
अखिल चित्रे पुढे म्हणाले, की आमचं स्वप्न मुंबई शांत, सुरक्षित आणि शाश्वत विकासाच्या मार्गावर राहावी हेच आहे. मात्र भाजपला ते नको. मराठी विरुद्ध गुजराती, उत्तर भारतीय, हिंदी भाषिक असे सर्व प्रयत्न फसल्यावर आता त्यांनी दोन समाजांत तणाव निर्माण करण्याचा नवा डाव टाकला आहे. यासाठीच एका तथाकथित जैन मुनीला पुढे करून मुंबईच वातावरण बिघडवण्याचं राजकारण सुरू आहे. हिंसाचाराला चिथावणी देणं हे जैन तत्वज्ञानात मुळीच बसत नाही. हिंदू-मुस्लिम तणाव वाढवणारी भाषा आणि लालबागमध्ये हिंदू-बांगलादेश असा विषय उकरून काढण्याच्या मागचा हेतू स्पष्ट आहे. असा आरोप त्यांनी भाजपवर केला आहे.
एवढीच देशसेवा करायची असेल तर सीमासुरक्षेबाबत अमित शहांनाच विचारणा करा. माझी जैन बांधवांना विनंती आहे, की आपण शांततेने मुंबईत राहतो. जर कोणी जैन धर्माचा वापर करून वाद पेटवत असले तर वेळीच थांबवा. भाजपचं सूत्र स्पष्ट आहे, use and throw. आज ते तुम्हाला वापरतील आणि उद्या वादाच्या तोंडाशी तुम्हालाच सोडून देतील. म्हणून या चिथावणीखोर जैन मुनी मागचा खरा बोलावता धनी कोण हे ओळखा आणि मुंबईची शांतता बिघडवू पाहणाऱ्या घटकांना रोखा, असं देखील अखिल चित्रे यावेळी म्हणाले.
धक्कादायक! बीडमध्ये ग्रामरोजगार सेवकास रॉडने रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण
नेमकं जैन मुनी निशेषचंद्र विजय काय म्हणाले होते. तर ते म्हणाले, की संपूर्ण लालबाग परिसरात उद्धव ठाकरे यांचं राज्य आहे.
कुठल्याही नेत्याला तुम्ही फोन करा, माझ्या बिल्डिंगमध्ये प्रॉब्लेम झाला आहे, ते येणार नाहीत. आमदार त्यांचे, खासदार त्यांचे आणि नगरसेवक देखील त्यांचेच. चापट मारून तुम्हाला मतदान करायला सांगतील हे लक्षात ठेवा. तुम्ही आता मार खात आहात. हे तुम्हाला परत मारतील. मोदींनी सांगितलं होतं, की बटेंगे तो कटेंगे तर मी जैनांना सांगत आहे की, बटेंगे तो तुम पिटोगे. सर्वात पहिले आपली वोट बँक मजबूत करा. आज आपल्या महाराष्ट्रात हिंदू-मुस्लिम आणि बांग्लादेशींसोबतच वाद दुसरीकडेच राहिला आहे. मात्र आता मारवाडी विरुद्ध मराठी असा वाद सुरू झाला आहे, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती. जस चिकनच्या नादी लागून शिवसेना गेली, तसं तुम्ही पण झिरो व्हाल, अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्यावर देखील केली होती.
